Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

पश्चाताप

-----------लघुकथा----------- ----------------------------------------  !! *पश्चाताप* !! *प्रा.डॉ.नरेश इंगळे* मु.भांबोरा ता.तिवसा जि. अमरावती..              उन्हाळ्याचे दिवस.धगधगत्या अन कडक उन्हामुळे लोक दुपारच्या वेळेत थंड गारव्यात विसावा घेत होते.अशातच मी जयंत च्या घरी गेलो. जयंत घरी एकटाच  विचारमग्न होता.मी तिथे आलो आहे याबाबतीत त्याला पुसटशीही कल्पना आली नाही.तो अगदी विचार प्रवाहात वाहून गेला होता. कडक उन्हाची वेळ असल्याने नुकताच तो शेतातून घरी आला होता.हातपाय न धुता तो ओसरीमध्ये एकटाच बसला होता.त्यांच्या अंगावरून भराभर घाम वाहत होता. तरीही तो विचारमग्नच.अचानक मी त्याची शांतता भंग केली आणि सहज प्रश्न केला की, काय साहेब कशाचा विचार करता?अगदी बेहोश माणूस जसा अचानक शुद्धीवर येतो तसाच जयंत शुद्धीवर आला व स्वतः ला सावरत केविलवाण्या स्वरात म्हणाला,कशाचा विचार करतो,काही नाही केलेल्या कर्माची फळे भोगतोय. त्याच्या अशा बोलण्याने मी अवाक झालो.कर्माची फळे, तुमच्या सारखा खुशाल चेंडू माणूस आणि त्यातही आर्थिक संपन्न तसेच खूप सुखी,समाधानी-आनंदी असलेल्या ज...

संघर्ष

*प्रिती चा संघर्ष-----संपता संपेना* !!! *प्रा.डॉ.नरेश शं इंगळे* मु.भांबोरा ता.तिवसा जि., अमरावती मोबा.९९७०९९१४६४ ईमेल-nareshingale83@gmail.com          रविवारचा दिवस. शहराकडून गावाकडे परत येत होतो.वाटेतच पावसाने झोडपले.मित्रासह ओलेचिंब झालो.वाटेतच माझी बालमैत्रीण प्रीतीचे गाव लागले.अचानक आम्ही तिच्या घरी पोहोचलो.प्रीती मुलाबाळांत  रममान होती. आमच्या अचानक जाण्याने ती आश्चर्यचकित झाली. लगेच भानावर येत तिने आमचे आगत स्वागत केले.मी सहज तिच्या सांसारिक जीवनातील सुख दुःखाचे विचारणा केली ती जरा थबकली.अन अलगद पणे स्मितहास्य करीत सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. मात्र तिला तिच्या मनातील वेदना लपवीता आल्या नाही. आणि तिच्या आयुष्यातील अविरत संघर्ष भराभर माझ्या दृष्टिपटलावर येण्यास वेळ लागला नाही.          प्रीती बालपणापासूनच खेळकर, उत्साही, मेहनती चीवट वृत्तीची आणि सामाजिक जाणिवेची सुद्धा.गरिबी आणि हलाखीच्या स्थितीतही  तिने परिस्थितीशी कडवी झुंज देत अथक प्रयत्नाने बरेच काही मिळविले आहे इतकेच नव्हे तर ती सर्वांच्या आदरास सह प्रेरणेस पात्र...

कास्तकाराचं वास्तव जीवन जागल

"कास्तकाराचं वास्तव जगणं मांडणारा काव्यसंग्रह : "जागल " ------------------------------------------------ *प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे* *मु.भांबोरा ता.तिवसा* *जिल्हा अमरावती* ९९७०९९१४६४ dr-nareshingale.blogspot.com --------------------------------------------------        अगदी शेती-माती आणि मायबोली मराठी भाषेशी नाते जपणारे सेवानिवृत्त शिक्षक,ज्येष्ठ कवीवर्य,समीक्षक जागलकार अरुण हरिभाऊ विघ्ने (रोहणा ता. आर्वी जि.वर्धा) यांचा "जागल" हा तिसरा काव्यसंग्रह.तत्पूर्वी त्यांचे "पक्षी"(२०००) आणि "वादळातील दीपस्तंभ" असे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे. तर "मी उजेडाच्या दिशेने निघालो' हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.अस्सल वऱ्हाडी भाषेचा तडका असलेल्या या काव्यसंग्रहात कवींनी जे भोगले,सोसले,अनुभवले अन दृष्टीत पडले तेच त्यांनी अगदी बिनधास्तपणे आणि तितक्याच ताकदीने/तळमळतेने काव्य स्वरूपात मांडले.ग्रामीण संस्कृतीशी निगडित भाव-भावना आणि कष्टकरी माणसाच्या व्यथा वेदनांना त्यांनी आपल्या प्रगल्भ लेखणीतून खऱ्या अर्थाने वाट मोकळी करून दिली.काळाच्या ओघात...

कासत्काराचं जगणं मांडणारा काव्यसंग्रह म्हणजे:-जागल

"कास्तकाराचं वास्तव जगणं मांडणारा काव्यसंग्रह : "जागल " ------------------------------------------------ *प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे* *मु.भांबोरा ता.तिवसा* *जिल्हा अमरावती* ९९७०९९१४६४ dr-nareshingale.blogspot.com --------------------------------------------------        अगदी शेती-माती आणि मायबोली मराठी भाषेशी नाते जपणारे सेवानिवृत्त शिक्षक,ज्येष्ठ कवीवर्य,समीक्षक जागलकार अरुण हरिभाऊ विघ्ने (रोहणा ता. आर्वी जि.वर्धा) यांचा "जागल" हा तिसरा काव्यसंग्रह.तत्पूर्वी त्यांचे "पक्षी"(२०००) आणि "वादळातील दीपस्तंभ" असे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे. तर "मी उजेडाच्या दिशेने निघालो' हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.अस्सल वऱ्हाडी भाषेचा तडका असलेल्या या काव्यसंग्रहात कवींनी जे भोगले,सोसले,अनुभवले अन दृष्टीत पडले तेच त्यांनी अगदी बिनधास्तपणे आणि तितक्याच ताकदीने/तळमळतेने काव्य स्वरूपात मांडले.ग्रामीण संस्कृतीशी निगडित भाव-भावना आणि कष्टकरी माणसाच्या व्यथा वेदनांना त्यांनी आपल्या प्रगल्भ लेखणीतून खऱ्या अर्थाने वाट मोकळी करून दिली.काळाच्या ओघात...