Skip to main content

Posts

डॉ. आंबेडकरांचा अर्थशाष्ट्रीय दृष्टीकोन

"डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन " ----------------------------------------      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध असे पैलू आहेत.मानवाचा सर्वांगीण विकास आणि कल्याणाच्या दृष्टीने विविध विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण असे भाष्य केले.एकाच वेळी सामाजिक परिवर्तन आणि जातीय निर्मूलनाची लढाई लढताना त्यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाकडे येनकेन प्रकारे विसर पडल्यागत झाला.थोर समाजसुधारक,शिक्षणतज्ञ,उत्तम पत्रकार,भारतीय घटनेचे शिल्पकार,महिला व बहुजन समाजाचे उद्धारकाबरोबरच ते एक उत्तम अर्थशास्त्री सुद्धा होते.त्यांचा अर्थशास्त्रीय व्यासंग आणि अभ्यास व्यापक स्वरूपाचा होता.त्यांच्यातील अर्थशास्त्रीय दृष्टिकोन अतिशय सुस्पष्ट आणि भारताच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी पोषक स्वरूपाचा होता.डॉ.आंबेडकरांचे वित्तविषयक ज्ञान सखोल आणि उच्च दर्जाचे होते.मानवावाचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक परिवर्तनाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी वित्त विषयक केलेले मूलभूत लेखन त्यांचा दृष्ट्या वित्तविचाराचं महत्व अधोरेखित करणारं आहे. आंबेडकराच्या व्यक्तिमत्वा...
Recent posts

श्रमविभाजन-जातीप्रथा आणि डॉ. आंबेडकर

श्रमविभागणी-जातीप्रथा आणि डॉ.आंबेडकर  -------------------------------------------- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे  भांबोरा ता.तिवसा जि.अमरावती मोबाईल- 9970991464 --------------------------------------------                  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचे अनेकविध पैलू आहेत.विषमतावादी भारतीय समाजरचनेत डॉ.आंबेडकर सामाजिक व राजकीय परिवर्तनासाठी अखेरच्या क्षणापर्यंत निकराने लढलेत.भारतीय समाज त्यांच्या राजकीय,सामाजिक आणि धार्मिक विचाराबाबतीत जितका अवगत आहे तितका आर्थिक विचाराबाबत अवगत नाही. डॉ.आंबेडकरांचे आर्थिक क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण अनं अतुलनीय आहे. डॉ.आंबेडकरांनी कृषी विकास,औद्योगीकरण, रोजगार निर्धारण, मजूर संघ, लोकसंख्या समस्या, आंतरराष्ट्रीय व्यापार, बँकिंग, विमाक्षेत्र, वित्तीय आणि मौद्रिक धोरण, केंद्र-राज्य वित्तीय संबंध इत्यादी बाबतीत सखोल असा अभ्यास व त्या अनुषंगाने वेळोवेळी अभ्यासपूर्ण केलेली मांडणी त्यांना जागतिक अर्थशास्त्रज्ञाच्या यादीत समाविष्ट करणारे आहेत.       ...

शिवजयंती- सत्कार 06 मार्च 2026

छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टी असलेले राजे          -प्रा.डॉ.नरेश इंगळे  शिवजयंती - मान्यवराचा सत्कार          छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वर्षांपूर्वीच भविष्यातील आव्हानांचा अंदाज घेऊन त्यासाठी तयारी केली होती.नौदलाची स्थापना,किल्ल्यांची सुरक्षा, संरक्षण व्यवस्था,प्रशासकीय व्यवस्था, लष्करी शिस्त,आर्थिक विकास इत्यादी बाबी आधुनिक काळातही थक्क करणाऱ्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि अद्वितीय नेतृत्व क्षमता आजही भारतीयांना/युवकांना प्रेरणादायी आहे असे मत प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे यांनी व्यक्त केले आहे.              अमरावती जिल्ह्यातील शेंदुरजना माहुरे येथील मानवता मंदिर परिसरात आयोजित शिवजयंती महोत्सव कार्यक्रम प्रसंगी उपस्थितीताना मार्गदर्शन करताना केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत मुख्याध्यापक गुणवंतराव देवतारे तर प्रमुख पाहुणे म्हणून तिवसा पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव माहुरे, बालकीर्तनकार अभिजित बेलूरकर,खरेदी विक्री संघ तिवसाचे सभापती सुरेश...

विलासराव माहुरे म्हणजे -गोरगरीबासाठी आशेचा किरण

विलासराव माहुरे म्हणजे "गोरगरिबासाठी आशेचा किरण" -------------------------------------------- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे मोबा. 9970991464 ---------------------------------------------                   एक उत्तुंग अनं कृतिशील व्यक्तिमत्व म्हणून विलासराव माहुरे यांच्या कार्यकर्तुत्वाच्या बाबतीत महाविद्यालयीन जीवनापासून अनुभवले अनं कालांतराने त्यांच्यातील अनेकविध कार्यकर्तुत्वाचे पैलू उलगडत गेले.ग्रामीण भागातील एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती आणि एक खंदा अनं समाजाचे दुःख वेचणारा शिवसैनिक म्हणून त्यांच्या जीवन प्रवासाची अनुभूती यायला लागली.शिक्षकी पेशातील शिस्तप्रिय वडिलांच्या तालमीत तयार झालेल्या संस्कारक्षम विलासरावांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाला शिरोधार्य मानून ना मागचा विचार केला ना पुढचा विचार,ना कुटुंबाचा ना वैयक्तिक आयुष्याचा विचार केला.शिवसेनेची भगवी पताका हाती घेऊन राजकीय सामाजिक व विविधांगी कार्यासाठी शिवधनुष्य खांद्यावर घेतले. सामाजिक,राजकीय परिवर्तन आणि बाळासाहेबांच्या विचाराने पछाडलेल्या ध्येयवेढ्या विलासर...

भाविकांचे श्रद्धास्थान :- श्री संत शंकर महाराज

                            सुधारीत लेख  *भाविकांचे श्रद्धास्थान*  *श्री संत शंकर महाराज* ---------------------------------------- *स्वाती नरेश इंगळे* *मु.भांबोरा ता.तिवसा* *जि.अमरावती* *मोबाईल-९९७०९९१४६४* ----------------------------------------        महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.संत परंपरेचा वारसा हा  अमरावती जिल्याला सुद्धा लाभलेला आहे.महाभारत काळापासून तर आधुनिक काळापर्यंत अनेक संत/महात्मे याच भूमीत जन्मलेले आहे.अशा या संताच्या भूमीमध्ये पूर्वीचा तिवसा आणि विद्यमान धामणगाव रेल्वे तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळखुटा या लहानशा खेड्यामध्ये श्री संत शंकर महाराज यांचा १९४५ मध्ये गरीब व निरक्षर कुटुंबामध्ये हरितालिका या दिवशी जन्म झालेला आहे. बुधाजी नागपुरे व भागीरथीबाई नागपुरे हे त्यांचे माता-पिता.श्री संत शंकर महाराज हे त्यांचे सातवे रत्न.         बाबाचा जन्म तसा अत्यंत दारिद्र्यमध्ये व्यतीत करणाऱ्या भूमिहीन कुटुंबामध्ये झालेला आहे.त्यातच श्री संत शंक...

मानवी कल्याणाचे उर्जास्रोत बुद्ध विहारे !!!

*"मानवी कल्याणाचे ऊर्जा स्त्रोत* *:--बुद्ध विहारे"* ---------------------------------------- प्रा. डॉ.नरेश शं.इंगळे अर्थशास्त्र विभाग प्रमुख श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता.धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती मोबाईल- ९९७०९९१४६४ ----------------------------------------         समग्र क्रांतीचे अग्रदूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली पवित्र अशा नागपूरच्या पवित्र भूमीवर पिढ्यानं-पिढ्या निपचित पडलेल्या लाखो अनुयायासह  बौद्ध धम्माचा अंगीकार केला. जगाच्या इतिहासातील "न भूतो न भविष्यती " अशी ही घटना म्हणावी लागेल.अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेला अन शिक्षणापासून कोसो दुर असलेला हा परिवर्तित; शोषित, पिडीत,वंचित,अस्पृश्य समाज बौद्ध तत्त्वज्ञानाबाबत तितकाच अनभिज्ञ होता.या सकल समाज घटकाचा सर्वंकष उद्धाराचा ध्यास घेतलेल्या डॉ.बाबासाहेबावरच्या अगाध आस्थेपोटी तत्कालीन अस्पृश्य समाज बुद्धाच्या चरणी नतमस्तक झाला.धर्मांतरानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अल्पावधीतच महापरिनिर्वाण झाले. परिणामतः डॉ.आंबेडकराना बुद्ध धम्माचा प्रचार व प...

मानवी कल्याणाचे ऊर्जास्रोत :-बुद्ध विहारे !!!

*"मानवी कल्याणाचे ऊर्जा स्त्रोत* *:--बुद्ध विहारे"* ---------------------------------------- प्रा. डॉ.नरेश शं.इंगळे अर्थशास्त्र विभाग प्रमुख श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता.धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती मोबाईल- ९९७०९९१४६४ ----------------------------------------         समग्र क्रांतीचे अग्रदूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली पवित्र अशा नागपूरच्या पवित्र भूमीवर पिढ्यानं-पिढ्या निपचित पडलेल्या लाखो अनुयायासह  बौद्ध धम्माचा अंगीकार केला. जगाच्या इतिहासातील "न भूतो न भविष्यती " अशी ही घटना म्हणावी लागेल.अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेला अन शिक्षणापासून कोसो दुर असलेला हा परिवर्तित; शोषित, पिडीत,वंचित,अस्पृश्य समाज बौद्ध तत्त्वज्ञानाबाबत तितकाच अनभिज्ञ होता.या सकल समाज घटकाचा सर्वंकष उद्धाराचा ध्यास घेतलेल्या डॉ.बाबासाहेबावरच्या अगाध आस्थेपोटी तत्कालीन अस्पृश्य समाज बुद्धाच्या चरणी नतमस्तक झाला.धर्मांतरानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अल्पावधीतच महापरिनिर्वाण झाले. परिणामतः डॉ.आंबेडकराना बुद्ध धम्माच...