*आंबेडकरी नेत्यांना विचारमंथनाची गरज* *बसपा विरोधक नव्हे,समविचारी मित्रपक्ष!* ---------------------------------------- *प्रा.नरेश इंदूशंकर इंगळे* *मु,भांबोरा,ता.तिवसा,जि. अमरावती.* ---------------------------------------- (अपूर्ण लेख-संग्रहित लेख) ----------- बहुजन समाज पक्ष सुद्धा स्वतंत्र निवडणूका लढल्या. या निवडणुकीत विशेषतः विदर्भात बसपाला ५,२०,८१४,भारिप-बमसंला २,७४,४०४, आरिपाला ३१,४६६, तर सर्व रिपब्लिकन गट मिळून ७,०२,२५२ एवढी एकूण मते मिळालीत.बसपाने विदर्भातील अकराही मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते.एवढे मात्र निश्चित की,वेगवेगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या गटापेक्षा बसपाने बाजी मात्र निश्चितच मारली. *मतविभाजनाचा फायदा* डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष वेगवेगळ्या गटात विखुरला गेल्याने तसेच बसपाने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने आंबेडकरी मतांची विभागणी होऊन जातीयवादी पक्षाला बळ मिळाले.आंबेडकरी मतावर डोळा ठेवून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मताचे नेहमीच भांडवल केले. ...