Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

अशोक ढोले स्मृती दिन

*स्मृती दिनानिमित्त*    *(३१डिसेंबर)* ----------------------------------------  *ग्रामीण दलित साहित्य चळवळीतील तेजोमय तारा म्हणजे* *:- अशोक परसरामजी ढोले:-* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे* *मु.भांबोरा ता. तिवसा* *जि.अमरावती* ----------------------------------------          विषमतावादी स्वभावाने केलेला अन्याय आणि या अन्यायाला प्रखरतेने लढा देणारे वैचारिक विद्यापीठ आणि ग्रामीण दलित साहित्य चळवळीतील तेजोमय तारा म्हणजेच कालकथित अशोक परसरामजी ढोले होय.एक बंडखोर आणि आंबेडकरी विचारांचा प्रचंड ऊर्जा/तळमळ असलेला कवी,साहित्यिक,आणि विचारवंत असलेला हा तारा वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०१७ ला अचानक मावळला.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.         समाजाप्रती प्रचंड आस्था असलेला आणि आंबेडकरी विचार नसानसात भिनलेले अशोक ढोले यांचे बालपण अगदी छोट्याशा गावात म्हणजेच तिवसा तालुक्यातील वरखेड या गावी गेले.अशोकराव यांचा जन्म हा साठच्या दशकातील.डॉ. बाबासाहेब आंबेडकरां...

निबंध स्पर्धा

*राज्यस्तरीय निबंध स्पर्धा.* ---------------------------------------- *श्रीसंत शंकर महाराज आश्रम ट्रष्ट पिंपळखुटा*  द्वारा संचालित ----------------------------------------  *श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय,पिंपळखुटा*  ता.धामणगाव रेल्वे जिल्हा-अमरावती     या महाविद्दालायातील ----------------------------------------  *'विद्यार्थी विकास विभागां'तर्गत* ---------------------------------------- *राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे*  आयोजन करण्यात येत आहे.  *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ----------------------------------------  *“महिला सक्षमीकरणात :-सावित्रीबाई फुले यांचे योगदान”* ----------------------------------------         या विषयावर स्वहस्ताक्षरात किंवा टंकलिखित निबंध  pdf स्वरूपात दि.१५ जानेवारी २०२१ पर्यंत nareshingale83@gmail.com  या ईमेल आयडीवर  पाठवावे.    *नियमावलीः* १) स्पर्धक विद्दार्थी हा वरिष्ठ महाविद्यालयाचा असावा तसेच शैक्षणिक सत्र २०२०-२१...

नामा

*सामान्य माणसाची असामान्य कामगिरी उलगडणारी "नामा" कादंबरी*        सामाजिक जाणिवेतून कसदार लेखन करणाऱ्या नव्या पिढीतील मोजक्या लेखकापैकी एक म्हणजे पुरोगामी चळवळीतील अग्रणी आणि आंबेडकरी विचारवंत कवी,लेखक रवी दलाल हे एक आहेत.राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर असलेल्या तिवसा या तालुक्याच्या ठिकाणी त्याचा बालपण गेलेल आहे आणि येथेच त्याची जडणघडण झाली आहे. त्यामुळे ईथल्या परिस्थितीचा/समाजजीवनाच मार्मिक आणि वास्तव परिस्थितीच चित्रण त्यांच्या एकंदर लेखनातून प्रतिबिंबित होते.वयाच्या अवघ्या विशीच्या आत रवी दलाल यांच्या लेखन कौशल्यातून वादळरेषा,आम्ही स्वातंत्र्यात प्रवेश करतो,स्मशानातील माती (काव्यसंग्रह),नामासह पारध, खाल्याखैली,आठवणीतील दिवस (कांदम्बरी),अवधुती भजन बौद्ध धम्मातील प्रवाह (समीक्षाग्रंथ) अशी अनेक पुस्तके व काव्यसंग्रह लक्षवेधी ठरलीत.त्यापैकी सामान्य माणसाची असामान्य कामगिरीचे वास्तव उलगडणारी कादंबरी म्हणजे "नामा" कादंबरी होय.कादंबरीतील मुख्य नायक नामा म्हणजेच नामदेव शिवराम कठाणे हा होय.अक्षरशून्य पण भारदस्त व्यक्तिमत्वाचा धनी असलेला नामा सर्वपरिचित असला...