Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

स्व.राजीव गांधी यांना अभिवादन

स्व.राजीव गांधी यांना अभिवादन     श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे माहिती तंत्रज्ञान युगाचे जनक भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती  सदभावना दिन म्हणून साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवर यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमाला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश इंगळे प्रा.डॉ.मेघा सावरकर, अमित मेश्राम ओमप्रकाश  इंगोले सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

विनावेतन शिक्षकाची दैनावस्था

*५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त विशेष लेख* --------------------------------------------------- *विनावेतन शिक्षकासाठी नियमित वेतनाची तरतूद करता येत नसेल तर या शिक्षक दिनी सर्व विनावेतन शिक्षकांना शासन मान्य "वेठबिगारी"चे प्रमाणपत्र देऊन गौरव करावा अशी आर्त हाक या विनावेतन शिक्षकांची आहे !* --------------------------------------------------  *विनावेतन शिक्षकांची दैनावस्था*                   प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे                  ९९७०९९१४६४ ---------------------------------------------------         व्यक्तिगत तसेच देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षणाचे अत्यंत मोलाचे असे स्थान आहे.देशासाठी आवश्यक तसेच योग्य आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्याची सोबतच संस्कारक्षम भावी पिढी घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकाच्या खांद्यावर आहे. शिक्षकही असे आवाहन तितक्याच जबाबदारीने पेलतो. परंतु शासनाची शिक्षकाप्रति उदासीन नीती तसेच सोईस्कर आणि तकलाटू धोरणाने समाजातील एका जबाबदार घटकाला अर्थात श...

राष्ट्रीय सेवा योजना:-एक लोकचळवळ

२४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसानिमित्त विशेष लेख ---------------------------------------- *राष्ट्रीय सेवा योजना*:-  *एक लोकचळवळ*          *प्रा.डॉ. नरेश शं. इंगळे*            ९९७०९९१४६४ ----------------------------------------     भारतातील युवाशक्ती ही अध्ययनासह सामाजिक जाणिवेतून विधायक कार्यातही अग्रेसर असावी या उदात्त हेतूने विद्यापीठीय/महाविद्यालयीन शिक्षणक्रमांत राष्ट्रीय सेवा योजना अस्तित्वात आली.प्रारंभी राष्ट्रीय छात्र सेनेला पर्याय म्हणून सुरू झालेली ही योजना आता सर्वव्यापक योजना झाली आहे. राष्ट्रीय सेवा योजना पथकाने आपल्या विविधांगी उपक्रमाने खऱ्या अर्थाने आता लोकचळवळीचे स्वरूप धारण केले आहे.युवाशक्ती आणि समाज एका धाग्यात गुंफले आहे.विशेष म्हणजे देशाच्या आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यासाठी रासेयो अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेच शिवाय देशातील युवाशक्तीना नवचेतना देण्याचे महत्वपूर्ण कार्य सुद्धा तितक्याच जोमाने करीत आहे.         भारत हा खे...

कर्तव्यतत्पर डी.आर.डेरे गुरुजी

कर्तव्यतत्पर/विद्यार्थीभिमूख *श्री डी.आर.डेरे गुरुजी*       एक उतुंग अन कर्तव्यतत्पर व्यक्तिमत्त्व म्हणून श्री. डी. आर.डेरे गुरुजी यांच्या कर्तुत्वाची चुणूक मी श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा येथे रुजू होताच अनुभवास आली.कालांतराने त्यांच्यातील अनेकविध कार्यकर्तुत्वाचे पैलू उलगडत गेले. ग्रामीण भागातील सर्वसाधारण कुटुंबातील श्री डी.आर.डेरे गुरुजी यांचा जन्म स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर म्हणजे १५ ऑगस्ट १९६२ ला पिंपळखुटा या संतभूमीत झाला.पदवी व पदव्युत्तर परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर श्री संत शंकर बाबा यांच्या आज्ञेने *श्री ज्ञानेश्वर रामकृष्णजी  डेरे* हे श्रीसंत शंकर महाराज विद्यामंदिर पिंपळखुटा येथे गुरुजी म्हणून रुजू झाले.          विशेष म्हणजे श्री.डेरे सर यांच्या पुढाकाराने तसेच सर्व भक्तांचे प्रयत्न आणि परमहंस श्रीसंत शंकर बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने सन १९८९ ला पिंपळखुटा या लहानशा गावात *श्री संत शंकर महाराज विद्यामंदिर* या नावाने शाळा सुरू करण्यात आली.सर्वप्रथम ८ वा वर्ग सुरू करून,त्याच नेतृत्व आदरणीय श्...

उजेडाच्या दिशेने निघालेली कविता

*समग्र परिवर्तनासाठी:- उजेडाच्या दिशेने निघालेली कविता !"                           ---प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे                          मोबाईल- ९९७०९९१४६४ ---------------------------------------------------          साहित्याच्या आरशात समाजाचा बदलता चेहरा प्रतिबिंबित होत असतो. साहित्य हे जीवनाचे चित्रण असते. मानवी भावनाविष्काराला त्यात अर्थातच प्राधान्य असते. भावनाविष्कार सयंत असतो. साहित्यातून आनंद निर्मिती व्हावीच पण उदबोधनही व्हावे अशीच भूमिका साहित्यिकाची असते. हीच भूमिका घेऊन एक साक्षेपी समीक्षक व सर्जनशील साहित्तीक कवी अरुण हरिभाऊ विघ्ने (मु.रोहणा ता. आर्वी जि.वर्धा )समग्र परिवर्तनाच्या प्रवासासाठी उजेडाच्या दिशेने निघालेले आहे. "मी उजेडाच्या दिशेने निघालो" हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह. सुरेख मांडणी आणि नाविन्यपूर्ण काव्यरचना हे या संग्रहाचं वैशिष्ट्य. तत्पूर्वी 'पक्षी' (२०००), 'वादळातील दीपस्तंभ '(२०१९), 'जागल ' (२०२०) असे तीन काव्...