Skip to main content

राष्ट्रसंत तुकडोजी यांना भारतरत्न पुरस्कार द्या

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या
***********************

    वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा अशी मागणी सन २००३ पासून चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचे अभ्यासक राजेंद्र मोहितकर गुरुजी यांनी केली.त्यांनी सन २००३ पासून सातत्याने १६ वर्षे या मागणीवर बराच पञव्यवहार केला.भारत सरकार,महाराष्ट्र सरकार व अनेक आमदार ,खासदार यांनाही निवेदने पाठवून चर्चा करून अवगत केले.सोबतच या मागणीचा प्रचार— प्रसार फार मोठ्या प्रमाणावर करून जनजागृती निर्माण केली.
       गावोगावी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात झालेल्या भाषणातून निवेदने, ग्रामसभेचे ठराव पाठविण्याचे आवाहनही त्यांनी केले.यासोबतच हजारो लोकांनी भारत सरकार,महाराष्ट्र सरकार यांचेकडे हजारो निवेदने, ग्रामसभेचे ठराव पाठविले. अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज अाश्रमने या मागणीचा बराच पाठपुरावा केला.
       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जेष्ठ सहकारी पूज्य तुकारामदादा गीताचार्य ,राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद चंद्रपूरचे अध्यक्ष प्रा.बंडोपंत बोढेकर,जीवन प्रचारक भानुदासजी कराळे,रमेश कचरे,अॅड. राजेंद्र जेनेकर,सत्यपाल महाराज, राष्ट्रसंत युवक विचारमंच महाराष्ट्र राज्य, सेवारत फाऊंडेशन तिवसा, ह.भ.प.साबळे महाराज, ह.भ.प.लक्ष्मणदास काळे महाराज, भाऊसाहेब थुटे,मोहनदास चोरे,संजय बेले,विकास बोरवार,सचिन राऊत,अमर वानखेडे, गजानन सहारे,सागर गोचे,नकुल पालखेड़े, मोहित ढोले, रमेशचंद्र सरोदे हरिभाऊजी वेरूळकर,ह.भ.प.उद्धवराव गाडेकर इ.अनेक कीर्तनकार, वक्ते,प्रचारक,कार्यकर्त्यांनी या मागणीचे समर्थन करून प्रचार,प्रसार, पञव्यवहार व पाठपुरावा केलेला आहे व गावागावातील हजारो लोकांना जागृत करून पञव्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे.
        ही मागणी तळागाळापर्यंत पोहचलेली आहे.आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला हे वाटत आहे की भारत देशासाठी अहोरात्र काम करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान देण्यासाठी १६ वर्षे होवूनही भारत सरकार निर्णय घेत नाही हे दुर्देव आहे.
       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारावर प्रेम करणारे तरूण विदर्भ व महाराष्ट्र राज्यात तसेच भारताच्या इतरही राज्यात आहेत .त्यांच्या मनात तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे.तुकडोजी महाराज यांचे प्रचंड व प्रभावी राष्ट्रीय व सामाजिक कार्य असताना व भारताच्या स्वातंञ्यासाठी भरीव योगदान असताना त्यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्याचा निर्णय घेण्यासाठी शासनाने प्रदीर्घ कालावधी लावावा ही निश्चितच दुर्दैवी बाब आहे .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे थोर क्रांतिकारी संत आहे.देशविदेशात त्यांनी भारत देशाची मान उंचावली.जपानच्या विश्वधर्म व विश्वशांती परिषदेत ते १९५५ ला भारत देशाचे प्रतिनिधी म्हणून ते गेले होते.जगातील अठरा राष्ट्राचे ते सल्लागार म्हणून नियुक्त झाले होते,अशा महामानवास भारत देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यास होत असलेला उशीर हे न उलगडणारे एक कोडे आहे.ही मागणी त्वरित पूर्ण व्हावी ही लाखो लोकांची मनातील इच्छा अाहे. भारत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी सर्वत्र मागणी होत आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...