रुग्णांची परवड--डॉक्टरांची कमतरता --आरोग्य यंत्रणा विस्कळीत---!!!
गोरगरिबांच्या हक्काचे असलेल्या तिवसा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा डॉक्टर अभावी रुग्णाची चांगलीकय परवड होत असल्याचे चित्र येथील रुग्णालयात आहे विशेष म्हणजे संपूर्ण रुग्णालयाचा भार हा एकाच डॉक्टरवर असल्याने आरोग्य यंत्रणा विस्कळीत होत असल्याचे नाकारता येत नाही
सध्या पावसाचे दिवस आहे पावसाळ्यात पावसाळ्यात बदलत्या वातावरणाने विविध आजारांची लागण ही नैसर्गिक आहे त्या अनुषंगाने तालुक्यामध्ये ताप खोकला सर्दी मलेरिया टायफॉईड असे विविध आजाराने थैमान घातले आहे असे गोरगरीब रुग्ण औषधोपचारासाठी तिवसा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयकडे धाव घेतात त्यामुळे ग्रामीण रुग्णालयांमध्ये दिवसागणिक रुग्णांची संख्याही वाढतीच आहे विशेष म्हणजे बाह्यरुग्ण विभागात दररोज १५० ते २०० रुग्ण आरोग्य तपासणी आणि औषधोपचारासाठी येतात मात्र रुग्णालयात पुरेशा डॉक्टरांअभावी रुग्णाचे चांगलीच परवड होत असल्याचे चित्र आहे त्याचं बरोबर बाह्य रुग्णासाठी निश्चित केलेल्या वेळेत सर्व रुग्णांची तपासणी होईलच असे नाही त्यामुळे अनेक रुग्णांना दुपारच्या ओपीडी ची पाहावी लागते किंवा दुसऱ्या दिवशी उपचारासाठी यावे लागते तर काही रुग्णांना नाईलाजाने खाजगी दवाखान्यात उपचारासाठी धाव घ्यावी लागते
तिवसा तालुक्यात कुऱ्हा मार्डी तळेगाव ठाकूर सह अन्य काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा आहे असे असले तरी ग्रामीण रुग्णालयाशी ८४ गावे संलग्नित आहे तसेच तिवसा हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असून वाहतुकीच्या वाढत्या वर्दळीने छोटे-मोठे अपघात नित्याचे आहे असे रुग्ण तातडीच्या उपचारांसाठी याच रुग्णालयात तसेच परिसरतील इमर्जन्सी पेशंट सुद्धा उपचारासाठी येथेच धाव घेतात मात्र येथील संपूर्ण आरोग्य यंत्रणेचाभार हा एकाच डॉक्टरवर त्यातही त्यांच्यावर अतिरिक्त अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार असल्याने आरोग्य यंत्रणा विस्कळीत होते त्याचा फटका हा रुग्णांना बसत असल्याचे कोणीच नाकारणार नाही म्हणून ग्रामीण रुग्ण आणि आकस्मिक रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य यंत्रणा विस्कळित होणार नाही यासाठी रिक्त असलेले चार डॉक्टर आणि वैद्यकीय अधीक्षक ही पदे तातडीने भरावी तसेच आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी अशी मागणी रुग्ण व नागरिकांकडून होत आहे
तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे- शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे. शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...
Comments
Post a Comment