Skip to main content

घरकुलासाठी पायपीट

घरकूलासाठी पायपीट
दिव्याअंग कुटुंबप्रमुखाची आर्त हाक------
मदतीसाठी जिल्हा परिषद सदस्य यांचा पुढाकार
------------------
     कुणी घर देता का घर अशी आर्त हाक दोन्ही डोळ्यांनी अपंग असलेल्या विनायक नवरंगे या व्यक्तींनी केली आहे.दरम्यान जि प सदस्य अभिजित बोके यांनी नवरंगे यांच्या घराची स्थिती लक्षात घेऊन घर बांधणी साठी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे
     तिवसा तालुक्यातील करजगाव येथील विनायक नवरंगे पत्नी दुर्गा मुलगी चैताली मुलगा मयूर यासह पडक्या फुडक्या घरा मध्ये वास्तव्यात आहे विनायक अपंग असल्याने कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी पत्नी दुर्गावर आहे. दुर्गा मोलमजुरीचे कामे करून कुटुंबाचा गाडा कसातरी पुढे रेटत आहे.अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या कुटुंबा चा  उदरनिर्वाह करणे कठीण आहे तेथे घराची उभारणी कशी करावी असा प्रश्न दुर्गांनी केला आहे.
      दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घरबांधणीसाठी पूर्वी इंदिरा आवास योजना आणि आता प्रधानमत्री आवास योजना अस्तित्वात आहे  या योजनेअंतर्गत घरकुल मिळेल अशी अपेक्षा या कुटुंबांना होती मात्र जाचक अटीमुळे सदर कुटुंब घरकुल पासून वंचित आहे सदर योजनेअंतर्गत अपंग व्यक्तीच्या कुटुंबांना ३ प्रतिशत घरकुलांचे वाटप करणे बंधनकारक असताना सुद्धा हे कुटुंबाना अद्यापही घरकुल प्राप्त झाले नाही. 2002 च्या दारिद्र्य रेषेच्या तआधारावर घरकुलासाठी प्रतिक्षा यादी संपुष्टात येऊन २०११ च्या सामाजिक आर्थिक जातीच्या आधारावरील घरकुलाचे वाटप केल्या जाते. 2011चे  सर्वेक्षणानुसार घरकुल वाटपासाठी अ ब क ड अशी यादी तयार करण्यात आली आहे. विनायक चे कुटुंब ड यादीत समाविष्ट असल्याने सध्यातरी निकषाप्रमाणे या कुटुंबाना घरकुल देणे शक्य नसल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि संबंधित विभागाचे कर्मचारी/अधिकारी वर्गाकडून सांगितले जाते.सर्वांसाठी घर या  शासनाचे धोरणानुसार आम्हाला हक्काचे घर कधी मिळणार असा  प्रश्न विनायक नवरंगे यांनी केला आहे.
     दरम्यान विनायक च्या कुटुंबाला घराची अत्यंत आवश्यकता लक्षात घेऊन अमरावती जिल्हा परिषदेचे सदस्य  अभिजित दादा बोके यांनी नवरंगे यांच्या कुटुंबाला भेट देऊन व्यथा जाणून घेतली. शासनाच्या निकषानुसार सद्या घरकुल देणे शक्य नसले तरी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचा काही निधी तसेच युवक काँग्रेस कडून निधी गोळा करून  घर बांधण्यासाठी  साहाय्य करणार असल्याचे तसेच  शासनाकडून घरकुल मिळवून देण्यासाठी/ मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोके यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...

संत गाडगेबाबा आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध

*संत गाडगे बाबा आणि डॉ.आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे* मु.भांबोरा ता.तिवसा,जि.अमरावती. भ्रमणध्वनी-९९७०९९१४६४ ----------------------------------------         विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणेच्या कार्यात/आंदोलनात ज्या महापुरुषांचा उल्लेखनिय व महत्वपूर्ण सहभाग होता त्यात लोकसंत,कर्मयोगी, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. दीनदलित,पीडित,वंचित आणि दुःखीताच्या कल्याणासाठी या दोन्ही बाबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले,लढे दिले,आंदोलने केलीत.बळकट असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढणे आणि सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय आणि उद्दिष्ट होते.कीर्तन हे गाडगे बाबाच्या जन प्रबोधनाचे प्रमुख माध्यम तर डॉ.आंबेडकर यांनी सामाजिक,राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून हे कार्य आरंभले होते.त्यांच्या कार्याची दिशा आणि ध्येय समान होते.संत गाडगेबाबा हे डॉ.आंबे...