Skip to main content

प्राचीन मंदिरात मूर्ती

३०० वर्षे जुन्या वडाच्या झाडाच्या बुंध्यात सापडल्या मूर्ती
प्राचीन हनुमान व राम,लक्ष्मण,सीताच्या मूर्ती दिसल्या

    अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील भांबोरा गावात हनुमानजीच्या मंदिरा लगत असलेल्या ३००वर्षे जुन्या वडाच्या झाडाच्या बुधांत प्राचीन हनुमानाची मूर्त व राम,लक्ष्मण,सीता यांच्या एकत्र मृरत्या आढळून आल्या ही घटना आज शनिवारी दुपारी घडली त्यामुळे गावातील नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी करत प्राचीन मूर्त्याच्या दर्शनासाठी मोठा प्रमाणात गर्दी केली होती तर नागरिकांनी सामूहिक भोजनादार व किर्तनही केले याची चर्चा तालुकाभर रंगली
     तालुक्यातील १००० लोकवस्तीच्या भांबोरा या गावात प्राचीन काळापासून हनुमानाचे मंदिर असून या ठिकाणी महाकाय३००वर्ष जुने वडाचे महाकाय वृक्ष होते मात्र हे वृक्ष वाळत असल्याने या ठिकाणी या मंदिराचा गावातील लोकांनी सामूहिक वर्गणी करून जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे भल्या मोठ्या वडाचे वृक्ष तोडण्याचे काम सुरू होते गेल्या महिन्याभरापासून मुळासगट हे महाकाय वृक्ष तोडण्याचे काम सुरू असतांना या झाडाच्या मुळात बुंध्यात दोन मुरत्या दिसल्या त्यामुळे या महाकाय वृक्षात कशा काय मूर्त असेल ही कल्पना नागरिकांनी केली नव्हती या प्राचीन मुरत्या असल्याने मूरत्या निरखून पाहल्या तर या दोन्ही मूर्त्या हनुमानजी व राम लक्ष्मण व सीताच्या होत्या झाडाच्या मुळात मूर्त्या सापडल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली पाहता पाहता ही वार्ता परिसरातील गावात पोहचली त्यामुळे या मूर्त्या पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली व मूर्त्याचे विधीवत पूजा करत मूर्त्या लगतच्या हनुमान मंदिरात नेल्या व मूर्तीला सेंदूर लावण्यात आले नागरिकांनी या मूरत्याचे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या ठिकाणी नागरिकांनी पुन्हा सामूहिक वर्गणी गोळा करत गावात सामूहिक भोजनदान दिले व गावातील महिलांनी कीर्तन केले झाडात मूर्त्या सापडल्याची चर्चा तालुक्यात पसरली होती

कोट
गावात नव्याने मंदिर बांधण्यासाठी जुने महाकाय वडाचे झाड तोडण्याचे काम सुरू होते या झाडाच्या खाली मुळात दोन प्राचीन मूर्त दिसल्या त्यामुळे नागरिकांनी गर्दी केली नागरिकांची मोठ्या प्रमाणात यावेळी श्रद्धा दिसून आली
-- भालचंद्र पोल्हाड, पोलीस पाटील, भांबोरा

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...