Skip to main content

प्राचीन मंदिरात मूर्ती

३०० वर्षे जुन्या वडाच्या झाडाच्या बुंध्यात सापडल्या मूर्ती
प्राचीन हनुमान व राम,लक्ष्मण,सीताच्या मूर्ती दिसल्या

    अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील भांबोरा गावात हनुमानजीच्या मंदिरा लगत असलेल्या ३००वर्षे जुन्या वडाच्या झाडाच्या बुधांत प्राचीन हनुमानाची मूर्त व राम,लक्ष्मण,सीता यांच्या एकत्र मृरत्या आढळून आल्या ही घटना आज शनिवारी दुपारी घडली त्यामुळे गावातील नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी करत प्राचीन मूर्त्याच्या दर्शनासाठी मोठा प्रमाणात गर्दी केली होती तर नागरिकांनी सामूहिक भोजनादार व किर्तनही केले याची चर्चा तालुकाभर रंगली
     तालुक्यातील १००० लोकवस्तीच्या भांबोरा या गावात प्राचीन काळापासून हनुमानाचे मंदिर असून या ठिकाणी महाकाय३००वर्ष जुने वडाचे महाकाय वृक्ष होते मात्र हे वृक्ष वाळत असल्याने या ठिकाणी या मंदिराचा गावातील लोकांनी सामूहिक वर्गणी करून जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे भल्या मोठ्या वडाचे वृक्ष तोडण्याचे काम सुरू होते गेल्या महिन्याभरापासून मुळासगट हे महाकाय वृक्ष तोडण्याचे काम सुरू असतांना या झाडाच्या मुळात बुंध्यात दोन मुरत्या दिसल्या त्यामुळे या महाकाय वृक्षात कशा काय मूर्त असेल ही कल्पना नागरिकांनी केली नव्हती या प्राचीन मुरत्या असल्याने मूरत्या निरखून पाहल्या तर या दोन्ही मूर्त्या हनुमानजी व राम लक्ष्मण व सीताच्या होत्या झाडाच्या मुळात मूर्त्या सापडल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली पाहता पाहता ही वार्ता परिसरातील गावात पोहचली त्यामुळे या मूर्त्या पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली व मूर्त्याचे विधीवत पूजा करत मूर्त्या लगतच्या हनुमान मंदिरात नेल्या व मूर्तीला सेंदूर लावण्यात आले नागरिकांनी या मूरत्याचे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या ठिकाणी नागरिकांनी पुन्हा सामूहिक वर्गणी गोळा करत गावात सामूहिक भोजनदान दिले व गावातील महिलांनी कीर्तन केले झाडात मूर्त्या सापडल्याची चर्चा तालुक्यात पसरली होती

कोट
गावात नव्याने मंदिर बांधण्यासाठी जुने महाकाय वडाचे झाड तोडण्याचे काम सुरू होते या झाडाच्या खाली मुळात दोन प्राचीन मूर्त दिसल्या त्यामुळे नागरिकांनी गर्दी केली नागरिकांची मोठ्या प्रमाणात यावेळी श्रद्धा दिसून आली
-- भालचंद्र पोल्हाड, पोलीस पाटील, भांबोरा

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...

संत गाडगेबाबा आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध

*संत गाडगे बाबा आणि डॉ.आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे* मु.भांबोरा ता.तिवसा,जि.अमरावती. भ्रमणध्वनी-९९७०९९१४६४ ----------------------------------------         विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणेच्या कार्यात/आंदोलनात ज्या महापुरुषांचा उल्लेखनिय व महत्वपूर्ण सहभाग होता त्यात लोकसंत,कर्मयोगी, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. दीनदलित,पीडित,वंचित आणि दुःखीताच्या कल्याणासाठी या दोन्ही बाबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले,लढे दिले,आंदोलने केलीत.बळकट असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढणे आणि सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय आणि उद्दिष्ट होते.कीर्तन हे गाडगे बाबाच्या जन प्रबोधनाचे प्रमुख माध्यम तर डॉ.आंबेडकर यांनी सामाजिक,राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून हे कार्य आरंभले होते.त्यांच्या कार्याची दिशा आणि ध्येय समान होते.संत गाडगेबाबा हे डॉ.आंबे...