राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा म्हणून गावागावातून जात आहेत निवेदने
************************
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा म्हणून तिवसा येथील सेवारत फाऊंडेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारमंचच्या युवकांनी वरखेड येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरू परमहंस आडकोजी महाराज यांचे पुण्यतिथी महोत्सवप्रसंगी संकल्प केला.
या दोन्ही संघटनेच्या युवकांनी नुकतेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी थांबवून निवेदनही दिले.तसेच गावागावातून ग्रामसभेचे ठराव घेणे सुरू केलेले आहे.तसेच लोकांच्या सह्यांची निवेदने पाठविणेही सुरू केले.आहे.मुंबईला जावून त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा असा आवाज बुलंद केला.वरोरा,चिमूर, अड्याळ टेकडी, गुरुकुंज आश्रम इथेही त्यांनी भेटी देवून चर्चा केली यामध्ये विकास बोरवार,अमर वानखेडे व इतर अनेक युवकांचा समावेश आहे.महाराष्ट्रातील सर्व व इतर राज्यातील खासदारांना व आमदारांना लेखी निवेदने हे युवक पाठविणार आहेत.
याप्रमाणेच नागपूर येथील कीर्तनकार, सप्तखंजिरीवादक संजयभाऊ बेले हेही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा म्हणून कार्यरत आहे.त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंञी नितीनजी गडकरी,महाराष्ट्र राज्याचे उर्जामंञी चंद्रशेखर बावनकुळे,कृषीमंञी डाॅ.अनिल बोंडे यांना निवेदने दिलेली आहे.ही मागणी त्वरित पूर्ण न केल्यास बेमुदत उपोषणास बसण्याचाही निर्धार त्यांनी व्यक्त केलेला अाहे.तसेच फुबगाव जि.यवतमाळ येथील कीर्तनकार व प्रचारक ह.भ.प.रमेश कचेरीत महाराज हेही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा म्हणून कार्यरत आहे नुकतेच त्यांनी मंञी संजयभाऊ राठोड यांची भेट घेवून निवेदन दिले.या मागणीच्या अनुषंगाने ते आमदार ,खासदारांच्या भेटी घेवून चर्चा करित आहे.अमरावती जिल्ह्यातील युवकांनी खासदार नवनीत राणा यांची भेट घेवून निवेदन सादर केले.त्यांनी पुढील लोकसभा अधिवेशनप्रसंगी ही मागणी संसदेत मांडण्याचे आश्वासन दिलेले आहे.प्रा.बंडोपंत बोढेकर यांनी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी तसेच काॅलेजच्या विद्यार्थ्यांसमोर आयोजित व्याख्यानात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा म्हणून प्रचार केला.
चिमूर येथील राजेंद्र मोहितकर गुरूजी गेल्या १६ वर्षांपासून सन २००३ पासून पञव्यवहार व पाठपुरावा घेत आहे.अनेक सामाजिक संघटना व संस्था यांची निवेदने, ग्राम पंचायत, ग्रामसभा यांची निवेदने त्यांच्या पुढाकाराने गेलेली आहे.
कीर्तनकार मोहनदास चोरे,भाऊसाहेब थुटे, सतिश देशमुख, विद्यापीठ नामकरण चळवळीचे सरचिटणीस रमेशचंद्र सरोदे,सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज, रामपाल महाराज, इंजिनियर पवन दवंडे व इतर अनेक प्रचारक कीर्तनकार ही मागणी पूर्ण होण्याचेदृष्टीने कार्यरत अाहे.
तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे- शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे. शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...
Comments
Post a Comment