Skip to main content

भीम-गीते

*भीम--गीते*

*भीमाची जीवनकथा*

(चाल-आगे आगे चले हम)

सांगतो मी ऐका तुम्ही,भिमाची जीवन कथा
बालपणापासूनी, भीम माझा दुःखी होता !!धृ!!

  अठराशे एक्क्यांनव, एप्रिल चौदा तारखेला
उदरी भिमाईच्या, भिम जन्मास आला
आनंददुनिया गेले रामजी पिता !!१!!

शाळेच्या दारात,भीम अभ्यास करी
कुणाला ना आली दया,भिमाची थोडीतरी
शिक्षणात भिमाचा, पहिला नंबर होता !!२!!

बडोद्याला गेले जेव्हा,भीम करण्या नोकरी
दुरून फेके, चपराशी ते फाईल टेबलावरी
ऑफिसात मोठा तिथे, अधिकारी भीम होता !!३!!

भीम आले घरी,दुःख झाले रमा उरी
का आले परतूनी, सांगा ना हो साहेब खरी
मिटविणे आहे रमा,मला ही जातीयता !!४!!

  उच्च शिक्षण घेण्या, भिम गेले परदेशी
दिवस भर कष्ट करून,राही रमा उपवाशी
बोले रमा साहेबाला, करू नका माझी चिंता !!५!!

  महाडच्या चवदार तळी,
भीमाने केली गर्जना
म्हणें पाणी पेईल मी,भिणार नाही कुणा
लाठी आणि दगडाचा,वार झेलीत होता !!६!!

चौदा ऑक्टोबर दिनी,त्या छप्पन साली
हिंदू धर्म त्यागूनिया,बुध्दाची
दीक्षा दिली
नमविला भिमाने, बुद्धाचे चरणी माथा !!७!!

सहा डिसेंबरला,काळ धाऊन आला
सात कोटी दलितांचा, पाठीराखा नेला
लिहिली नरेश गाथा भाग्यवंत अश्रू ढाळीता !!८!!

     -रचना-
*प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे*
  मु.भांबोरा ता. तिवसा जि. अमरावती.
मोबा.९९७०९९१४६४
--------------------------------------------
*भीम शक्ती दाखवारे*
(आये हो मेरी जिंदगी मे-राजा हिंदुस्थानी)

भीमाच्या लेकरांनो,आता तरी जागे व्हारे
कुत्र्यापरी का जगता,भीमशक्ती दाखवारे!!धृ!!

स्वातंत्र्य, समता, बंधुत्व दिले मुलतत्व
कळेना भारतीय,नागरिकास महत्व
अंतकरणी भीम तत्वाला आता रुजवारे !!१!!

अन्याय अत्याचारी, जुलमी ती राजवट
केला भिमाने, तिचा क्षणात नायनाट
भिमाचे वीर रक्त अंगात साठवारे !!२!!

लागूनी पाठी आहे जातीयवादी भूत
बाबाच्या प्रतिमेचा,अपमान आहे होत
जगावे सिंहापरी तो संदेश आठवारे !!३!!

लिहिली भीमाने घटना जागुनी दिन-रात
लावील कुणी का बोट,छाटून टाकु हात
घटनेची रक्षा करण्या सारे समोर व्हारे !!४!!

निद्रेत नका राहु काटेरी आहे वाट वैऱ्याना दाखवारे तुमची ती एकजूट
नरेश भाऊ भावाचे वैर मिटवारे !!५!!
     --रचना--
*प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे*
मु.भांबोरा ता.तिवसा जि. अमरावती.
मोबा.९९७०९९१४६४
----------------------------------------
*भीम तत्त्वाची भाषा*

(चाल- दोन दिवसाची होती मी माहेरला)
भाषा करती पहा भिमाच्या तत्त्वाची
स्तुती करती  तोंडभरूनी वैऱ्याची !!धृ!!

गल्लोगल्ली झाले हे सारे लीडर
भीम लेकराची नाही हो यांना कदर
समाज सोडून संगत धरी परक्यांची !!१!!

आज विसरले आहे ते समाजाला
उद्या विसरती आपुल्या आई बापाला
नाही मोल यांना स्वतःच्या अब्रूची !!२!!

भाऊ भावाचे वैरी ते झाले इथे
बंधुभावाचे विसरले पहा नाते
स्वार्थापायी ना पर्वा, यांना कुणाची !!३!!

अशा स्वार्थी पुढाऱ्यांना, शिकू धडा
नरेश घेऊनी हाती तो झेंडा निळा
जान ठेवुनी भिमाच्या उपकाराची !!४!!

      --रचना--
*प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे*
मु.भांबोरा ता.तिवसा जि. अमरावती.
मोबा.९९७०९९१४६४
----------------------------------------
*जयभीम*
(चाल--परदेशी परदेशी जाना नही--राजा हिंदुस्तानी)

जयभीम जयभीम घ्यावा तुम्ही
मनापासूनी घ्या, मनापासूनी
जयभीम घेण्याला लाजता कशाला
भीती ही कुणाची आज नाही तुम्हाला!!धृ!!

दीन दुबळ्याचे होते भीम कैवारी
कर्तव्याची जाण असू द्या अंतरी
माणुसकीची वाट दाविली भीमाने
जगावे जीवन आता तरी मानाने
हा स्वाभिमान तुम्हा मिळवूनी दिला !!२!!

भीम बाबा ते सांगून गेले तुम्हा खरी
ताठ मानेने जीवन जगारे सिंहापरी
इज्जत आपली गमवू नका,स्वार्थासाठी
कुत्र्यावणी जाऊ नका,कुणापाठी
विसरू नका रे,भीम संदेशाला !!२!!

कार्य असे हे केले भीमाने मोलाचे
लिहिले संविधान भारत देशाचे
भारत भूमीवरती आहे त्याचे ऋण
करुनी दिली हक्काची आपल्या जाण
नरेश त्या हक्काने भाग्यवंत झाला !!३!!
     --रचना--
*प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे*
मु.भांबोरा ता.तिवसा जि. अमरावती.
मोबा.९९७०९९१४६४
----------------------------------------------------
सदर भीम गीते ही विद्यार्थी दशेत (१९९४ ते १९९८) लिहीलेली आहे त्यासाठी कविवर्य भाग्यवंत मेश्राम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
*प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे*
मोबा.९९७०९९१४६४

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...