Skip to main content

विद्यार्थीभिमुख श्री डी.आर.डेरे.

कर्तव्यतत्पर/विद्यार्थीभिमूख
*श्री डी.आर.डेरे सर*
    पिंपळखुटा येथील श्रीसंत शंकर महाराज विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री *ज्ञानेश्वर रामकृष्णजी  डेरे* हे ३१ ऑगस्ट २०२० रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा श्रीसंत शंकर महाराज विद्यामंदिर आणि कनिष्ट महाविद्यालयाचे वतीने सपत्नीक सत्कार शासन व आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन करून संपन्न झाला.
     श्री.डेरे सर यांच्या पुढाकाराने तसेच सर्व भक्तांचे प्रयत्न आणि परमहंस श्रीसंत शंकर बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने १९८९  ला पिंपळखुटा या लहानशा गावात *श्री संत शंकर महाराज विद्यामंदिर* या नावाने शाळा सुरू करण्यात आली. सर्वप्रथम ८ वा वर्ग सुरू करून,त्याच नेतृत्व आदरणीय श्री डी.आर.डेरे सर यांच्या कडे सोपविण्यात आले होते.
  शाळेचे पहिले मुख्याध्यापक,लिपिक,शिक्षक आणि चपराशी अशा चतुरस्त्र भूमिकेत त्यांनी शैक्षणिक कार्य सुरू केले.त्यावेळी  ८ व्या वर्गात केवळ १४ विध्यार्थी प्रवेशित होते.आज त्यांनी लावलेल्या या लहानशा रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे.सध्या स्थितीत या शाळेत जवळपास ६५० ते ७०० विध्यार्थी शिक्षण घेत आहे.याचे श्रेय श्री डेरे सर यांना जाते.
  श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट च्या माध्यमातून श्री संत शंकर महाराज एम.सी.व्ही. सी.तसेच कनिष्ट व वरिष्ठ महाविद्यालय आणि श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास त्याचा सिहाचा वाटा कुणीच नाकारणार नाही.गावातील तसेच परिसरातील कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये अशी त्यांची कायम भूमिका राहिली व आहे.
    सर्व विद्यार्थ्यांत लोकप्रियतेसोबतच सर्वांचे आवडते आणि लाडके असलेल्या सराचा स्वभाव शांत,मितभाषी,निटनिटकेपणा, वक्तशीरपणा, काटकसर,कार्यतत्पर,कोणतेही काम आनंदाने आणि पूर्ण क्षमतेने करून  खऱ्या अर्थाने ते सर्वांचे प्रेरणास्रोत ठरले आहे.
       शालेय अध्यापन कार्याबरोबरच परीक्षा विभाग,केंद्रसंचालक ,म्हणून त्यांनी लिलया आव्हान पेलले.पर्यावरण प्रेमी असलेल्या डेरे सर यांनी स्वतः झाडे लावून, नित्यक्रमाने रोज ते  विध्यार्थ्यांना रोपटे देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करीत असे.शाळेतील अन्य बाबतीतही त्यांनी अत्यंत मोलाचे कार्य केलेले आहे.
   शैक्षणिक कार्याबरोबरच  अध्यात्म त्याच्या आवडीचे क्षेत्र. धामणगाव रेल्वे येथील वास्तव्यास गेले असता तेथील विद्युत कॉलनीत  त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन परिसरातील लोकांना एकत्रित करून *श्री संत गजानन महाराज* मूर्ती प्रतिस्थापना आणि मंदिराची उभारणी करण्यास पुढाकार घेतला अन आगळेवेगळ्या वातावरणाची निर्मिती केली.पूर्वी सुनसान असलेल्या त्या कॉलनीत आता दर गुरूवारला  सर्व मंडळी एकत्रित येऊन महाप्रसाद सहभोजन करतात.आता तेथे भक्तिमय वातावरण झाले आहे. यासाठी तेथील नागरिक श्री डेरे सर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात.
 इतकेच नव्हे तर त्यांना भजन कीर्तनाची  आवड आहे.
 आपली आवड जोपासण्यासाठी त्यांनी इतर सहकारी मंडळीना सोबत घेऊन *भजन मंडळ* स्थापन केले.भजनाच्या माध्यमातून सर घरा घरात पोहचले आहे. त्यातही त्यांनी भजन हे सायंकाळी ७ ते रात्री १०  या वेळेतच असावे असा त्यांनी  नियम घालून दिला आहे.विशेष म्हणजे ज्या गावात भजन असेल त्या गावात भजनी मंडळी ही स्वमालकीच्या चारचाकी गाडीबरोबरच पेट्रोल खर्चाची जबाबदारी सुद्धा स्वतःच उचलतात हे विशेष!!
   अशा  निस्वार्थी,निगर्वी प्रामाणिक,कर्तव्यतत्पर श्री डेरे
 सर यांच्या कार्याला सलाम आणि  त्याच्या पुढील निरामय आयुष्याकरिता कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा!!!! 
----------------------------------------
*प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे*
*९९७०९९१४६४*
------------------------------------------

Comments

  1. श्री डेरे खरोखर आदर्श शिक्षक आहेत. त्यांच्या कर्याद्वारे प्रत्येक शिक्षकाने प्रेरणा घेऊनआपले पवित्र कार्य उत्कृष्टपणे पार पाडले गेले तर समाजामध्ये आपली प्रतिमा नक्कीच उंचावेल .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...