Skip to main content

फिरस्ती

" *फिरस्ती* म्हणजे सर्वसामान्याची प्रातिनिधिक स्वरूपाची प्रतिक्रियाच"
----------------------------------------
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
मु.भांबोरा ता.तिवसा
मोबा.९९७०९९१४६४
----------------------------------------
      दैनिक बहुजन सौरभ या वृत्तपत्रातील  "फिरस्ती" या स्तंभलेखनातील प्रा.संदीप गायकवाड यांच्या लेखनाचा प्रपंच  म्हणजे संपूर्ण देशातील सर्वसामान्य नागरिकांची प्रातिनिधिक स्वरूपाची प्रतिक्रियाच म्हणावी लागेल. फिरस्तीत प्रा गायकवाड संपूर्ण समाज जीवनाचे वास्तव चित्रच उभे करीत आहे.या स्तंभलेखनात जमीनी स्तरावर सर्वसामान्यांची होत असलेली होरपळ आणि कोरोना महामारी काळातील त्यांची हतबलता याचे प्रतिबिंबच फिरस्ती मध्ये उमटलेले दिसते. लेखकाची सामाजिक जाणीव आणि सर्वसामान्य प्रति असलेली आस्था/तळमळ यातून प्रकर्षाने जाणवते.दि १६ जून २०२१ रोजी "अस्वस्थ मनाची घालमेल" या मथळ्याखाली लेखात प्रा.संदीप गायकवाड यांनी महामारीच्या काळात सर्वसामान्यांची होणारी घालमेल आणि सरकारच्या तकलाटू धोरणाचा चांगलाच समाचार घेतलेला आहे.त्यात त्यांनी सर्वसामान्याच्या समस्या आणि वेदना दृष्टिपटलावर आणण्यास महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे असेच म्हणावे लागेल.
      सध्या कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिक भयभीत झालेला आहे.भुकेने व्याकूळ झालेला आहे.आरोग्य यंत्रणा पुर्णतः खिळखिळी झालेली आहे.खासगी उपचार सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही.सर्वसामान्यांच्या आर्थिक दुर्बलतेमुळे त्यांना महागडा औषधोपचार कसा करावा हा प्रश्न आहे.त्यातच पुरेशा उपचाराअभावी अनेकांना मृत्युला कवटाळण्याची वेळ येत आहे.पर्यायाने अनेकांचे कुटुंब उघड्यावर येत आहेत.थांबलेल्या अर्थव्यस्थेच्या चक्रात छोट्या-मोठ्या उद्योगधंद्याची वाट लागली आहे.अनेकांचे रोजगार गेले.नवे प्रकल्प कामगाराच्या जीवावर उठले आहेत.गरिबी-श्रीमंतीची दरी कमी होण्याऐवजी अधिकाधिक रुंदावत आहे.शिक्षण क्षेत्राचे तीन तेरा वाजत आहे.सरकार हतबल, नव्हे!कदाचित दुर्लक्षच करीत आहेत.देशातील मुख्य समस्येला बगल देऊन देशाचे  कार्यकारी प्रमुख विश्वगुरुचे स्वप्न दाखवीत आहे.त्यात सर्वसामान्य शोषित-पीडित नागरिकांचे स्थान काय? या सभोवती प्रा.गायकवाड यांची "फिरस्ती" आहे.त्यांची ही फिरस्ती अभिनंदनिय आणि सर्वसामान्यांना न्याय देणारी ठरेल यात शंकाच नाही.त्याच्या जनहीतकारी पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा......!

प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
मु.भांबोरा ता.तिवसा
जिल्हा अमरावती
मोबाईल-  ९९७०९९१४६४
------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र पं धारा

 तीर्थक्षेत्र पंचधारा ( श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार) -प्रा.डॉ. नरेश इंगळे-        शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.   शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडले.श्रीसंत अच्युत महाराजांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक भगनावस्थेतील शिवपिंडी सोबत देवीची मूर्ती सुद्धा दृष्टीत पडली. तसेच विखुरलेल्या १२ पिंडीही त...

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

शिवमंदिर श्री क्षेत्र धामंत्री

-प्रा.डॉ.नरेश इंगळे---     तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.       नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.   ...