*विषय :- अर्थशास्त्र*
बी.ए.भाग :-१ सेमिस्टर :-२
----------------------------------------
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
अर्थशास्त्र विभाग प्रमुख
श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता धामणगाव रेल्वे
------------------------------------------
१) ------महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
अ)1 मे 1960-
ब)1 जुन 1960
क) 1 जुलै 1960
ड) 1 ऑगस्ट 1960
२) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या---- इतकी आहे..
अ)11. 14 कोटी
ब)11.24 कोटी-
क)11.34 कोटी
ड) 11.44 कोटी
३)वर्धा व वैनगंगा नदीच्या संयुक्त प्रवाहास ---- म्हटले जाते.
अ) संयुक्त ब)जनहिता
क)प्राणहिता- ड) वरील सर्व
४) सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर ----- हे आहे.
अ) बैराट ब) चिखलदरा
क) तोरणमाळ ड) कळसुबाई-
५) प्रशासकीय दृष्ट्या महाराष्ट्र राज्याचे ----- विभाग आहेत.
अ) चार ब)सहा-
क) आठ। ड) दहा
६) महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे.
अ)कृषिप्रधान अर्थव्यवस्था
ब) वाढती लोकसंख्या
क) शहरीकरणात वाढ
ड)वरील सर्व-
७) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी -------- आहे
अ) गोदावरी- ब) भीमा
क)कृष्णा ड)तापी
८) महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे ------शहर आहे.
अ) अमरावती ब) मुंबई
क)नागपूर- ड)पुणे
९) An Essay on Principles of Population हा ग्रंथ ------ यांनी लिहिला आहे.
अ) थॉमस माल्थस- ब)डॉ.मार्शल
क) डेव्हिड रिकार्डो
ड)एडम स्मिथ
१०) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एक हजार पुरुषांमागे स्त्रियांची ------ संख्या आहे
अ) 929 ब) 943-
क) 922 ड)941
११) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनता------- आहे.
अ) 382 ब) 315
क)142 ड)365-
१२) सन 1961 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण-–-- इतके होते.
अ) 35.1- ब) 35.2
क) 35.3 ड) 35.4
१३) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्या---- कोटी इतकी आहे
अ) 5.04 ब) 5.06
क)5.08- ड)यापैकी नाही
१४) 2011 च्या जनगणनेनुसार भारतामध्ये नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र राज्याचा----- क्रमांक लागतो.
अ)प्रथम ब) द्वितीय
क) तृतीय- ड) चतुर्थ
१५)एका भागातून दुसऱ्या भागामध्ये होणारी माणसाची हालचाल म्हणजे----- होय.
अ) स्थलांतर- ब)नागरीकरण
क)ग्रामिनीकरण ड)यापैकी नाही
१६) भारताच्या एकूण भूभागापैकी----- प्रतिशत भूप्रदेश महाराष्ताला मिळाला आहे.
अ) 9.26 ब)9.36-
क) 9.46 ड)9.56
१७)महाराष्ट्राच्या वाट्याला------ चौरस किलोमीटर जमीन आलेली आहे.
अ) 3,07,317 ब) 3,07,713--
क)3,70,713 ड) 3,70,313
१८) नापीक व मशागतीस अयोग्य प्रकारच्या जमिनीचे प्रमाण सर्वात जास्त------तर सर्वात कमी-----मध्ये आहे.
अ) विदर्भ-कोकण
ब) मराठवाडा - विदर्भ
क)कोकण - विदर्भ-
ड)यापैकी नाही
१९) महाराष्ट्रामध्ये मशागती खालील नसलेल्या जमिनीचे सर्वात जास्त क्षेत्र------ या जिल्ह्यामध्ये आहे.
अ) चंद्रपूर-भंडारा
ब)धुळे-हिंगोली
क)अमरावती- अकोला
ड) भंडारा-गोंदिया-
२०)महाराष्ट्रामध्ये मशागती खालील नसलेल्या जमिनीचे सर्वात कमी क्षेत्र------ जिल्ह्यामध्ये आहे.
अ) चंद्रपूर-भंडारा
ब)धुळे-हिंगोली-
क)अमरावती -अकोला
ड) भंडारा गोंदिया
२१) भारतामध्ये कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा----- क्रमांक लागतो.
अ) प्रथम ब) द्वितीय-
क) तृतीय ड)चतुर्थ
२२) शेतीच्या अल्प उत्पादकतेचे कारण आहे
अ) शेतीचा लहान आकार
ब) अपुरा भांडवल पुरवठा क) मान्सूनचा लहरीपणा
ड) वरील सर्व-
२३)------भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हटले जाते.
अ)डॉ. एम. एस. स्वामीनाथन-
ब) नॉर्मन बोरलॉग
क)स्वर्गीय वसंतराव नाईक
ड) शरद पवार
२४) हरभरा हे----धान्य आहे.
अ) कडधान्ये- ब) तृणधान्ये
क) तेलबिया ड)यापैकी नाही
२५) महाराष्ट्र राज्याने---- पासून विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) धोरण स्वीकारले आहे.
अ) जानेवारी 2006
ब) फेब्रुवारी 2006-
क)मार्च 2006
ड) एप्रिल 2006
२६) महाराष्ट्र राज्याने -----मध्ये जैवतंत्रज्ञान धोरण जाहीर केले.
अ) 2001- ब) 2005
क) 2011 ड) 2016
२७) 1997 मध्ये आबीद हुसेन समितीने लघु उद्योगाची गुंतवणूक--–-- कोटी रुपयापर्यंत केली.
अ)तीन- ब) चार
क) पाच। ड) सहा
२८) महाराष्ट्रामध्ये पहिली कापड गिरणी--- येथे उभारण्यात आली.
अ) इचलकरंजी ब)बडनेरा
क) कोल्हापूर ड) मुंबई-
२९) महाराष्ट्राचे मॅचेस्टर या------ शहराला म्हटले जाते.
अ) इचलकरंजी- ब) बडनेरा
क) कोल्हापूर यापैकी नाही.
३०) महाराष्ट्रामध्ये पहिला साखर साखर कारखाना------- येथे उभारण्यात आला.
अ) प्रवरानगर ब)बेलापूर-
क) केळापूर ड)अकलूज
३१) डॉ. वर्गियस कुरियन यांना---- क्रांतीचे जनक म्हटले जाते.
अ) हरितक्रांती ब)निळी
क) धवलक्रांती- ड) यापैकी नाही
३२) राज्यातील पहिली रेल्वे सेवा---- दरम्यान सुरू झाली.
अ) मुंबई-भुसावळ
ब)मुंबई-ठाणे-
क)मुंबई-पुणे
ड)यापैकी नाही
३३) विदर्भामध्ये------ एकूण जिल्हे आहेत.
अ) सात ब) नऊ
क) अकरा- ड) तेरा
३४)-------यास महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
अ) भंडारा- ब) गोंदिया
क) चंद्रपूर ड)गडचिरोली
३५) 2011 च्या जनगणनेनुसार दर हजार पुरुषांमागे सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण------- जिल्ह्यात आहे.
अ) भंडारा ब) गोंदिया-
क)चंद्रपूर ड)गडचिरोली
३६)---------हे शेतकरी आत्महत्येची नोंद ठेवतात.
अ) नॅशनल सॅम्पल सर्व्हे
ब) नॅशनल पापुलेशन ऑर्गनायझेशन
क) नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो-
ड) यापैकी नाही
३७)------ हे शेतकरी आत्महत्येचे कारण आहे.
अ) वाढता कर्जबाजारीपणा
ब) सततची नापिकी
क) वाढता उत्पादन खर्च
ड) वरील सर्व-
३८)---------येथे दीक्षाभूमी आहे.
अ) नागपूर- ब) मुंबई
क)पुणे ड)औरंगाबाद
३९)विदर्भामध्ये एकूण------- राष्ट्रीय उद्याने आहेत
अ)दोन ब)चार-
क)पाच ड)सहा
४०) विदर्भात एकूण-----औष्णिक विद्युत केंद्रे आहेत.
अ)दोन ब) चार
क) पाच- ड)सहा
----------------------------------------
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
९९७०९९१४६४
Comments
Post a Comment