Skip to main content

Posts

Showing posts from April, 2024

आजही दुविधेतच --भाग एक

*आजही दुविधेतच--------!!!*        मानवी जीवन अनेकविध अवस्था मधून जात असतय.अनेक चढउतार येत असतात.यातूनच मानवी जीवन समृद्ध होत असते.कधी सुखद तर कधी दुखद अनुभवाने हा जीवन प्रवास पुढे सरकत असतो.व्यक्ती आपल्या कुवतीनुसार प्रसंगानुरूप सामोरे जात असतो.कुणी कठीण प्रसंगाने खचतात तर कुणी आलेली  आव्हाने समर्थपणे पेलतात.म्हणूनच मानवी जीवन हे सुखदुःखाचा सागर आहे असे म्हटल्या जाते.संसाररुपी हा सागर अनेक घटनाचा/प्रसंगाचा खऱ्या अर्थाने साक्षीदार असतो.अविस्मरणीय अशा सुखद-दुःखद आठवणीतूच व्यक्ती वा व्यक्तीसमूह जीवन जगण्याचा मार्ग सुकर/निश्चित करीत असतो.सूर्या हा ही काहीसा याच धाटणीतील मुलगा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे अन प्रेरणा देणारे आहेत.त्याच्या जीवनात अनेक चढउतार आलेत अन त्याने ते समर्थपणे पेललेत.त्यातून त्यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं.शिवाय इतरांना प्रेरणा देणारा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.त्याच्या या संघर्षमय जीवन प्रवासाचा विशेषतः त्यांच्या अनोख्या प्रेम कहाणीच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.      ...

आजही दुविधेतच--भाग नऊ

*आजही दुविधेतच* *भाग :- नऊ*          लग्नापूर्वी किरणला भेटून सूर्याचं समाधान झालं.यानंतर तिची कधी भेट होईल याची अजिबात शाश्वती नाही.हे त्याला चांगलं ठाऊक आहे.एक-दोन महिन्याच्या फरकानं सूर्याचं लग्न थाटामाटात पार पडलं.त्याच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली.शिक्षण,नोकरी,व्यवसाय, आणि कुटुंबाला त्यांनं समर्पित केलं.लग्नानंतर प्रारंभीचे दोन वर्षे तो गावी अर्थात कुटुंबातच राहिला.त्यांच दरम्यान त्यांच्या संसारवेलीवर एक फुलही (मुलगी) उमललं.तदनंतर तो नोकरीच्या ठिकाणी राहायला गेला.त्यामुळे पूर्वीप्रमाणे त्याचा गावाशी संपर्क कमी झाला.तो संसारात रमला.गाव सोडलं पण त्याला किरणचा काही विसर पडला नाही.तिच्या आठवणी शिवाय त्यांच्याकडं दुसरं काही नव्हतं.अनेक वेळा ती त्याला आठवणीत घेऊन गेली आणि आजही आठवणीत घेऊन जात आहे.त्याचा आठवणीचा प्रवास काही थांबला नाही.असं घडत असताना तो याबाबतीत कुणाजवळ काहीही व्यक्त न होता तो कुढत बसलाय.अधून मधून तो गावी यायचा पण किरण त्याच्या नजरेत पडेल असं काही नव्हतं. अनाहुतपणे कधीतरी ती त्याच्या नजरेत पडत असे.पण असा प्रसंग विरळाच म्...