Skip to main content

Posts

Showing posts from March, 2024

आजही दुविधेतच----भाग:-आठ

*आजही दुविधेतच.....!!!* *भाग आठ*        किरणनं सपशेल नाकारनं सूर्याला काही पचलं नाही.त्याच्यासाठी हा जबरदस्त धक्का होता.त्या धक्क्यानं तो अधिकच भरकटला.दिवसेंदिवस तो कसा दिवस काढतो हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं.योग्य-अयोग्य समजण्यास त्याची नक्कीच गफलत झाली हे त्याला कळून चुकलं होतं.सोबत असताना ती त्याच्या आयुष्यात चंद्रप्रकाशाप्रमाणे अंधारावर मात करावी तसेच तिनं त्याच्या मनाच्या वेदनेवर हळुवार फुंकर घालून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देण्याचं अभिवचन दिलं होतं.आयुष्यभर साथ निभावण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या.आता तिचेच शब्द तिला आठवत नाही.तिनं दिलेल्या वचनाची पूर्ण वाट लावली अनं त्याला वाऱ्यावर सोडून गेली.सूर्यानं कळत-नकळत तिच्या संगतीनं आयुष्य घालविण्याचं स्वप्न बघितलं होतं.क्षणिक स्वप्नाच्या नादात तो चांगल्या दिवसाला कायमचा मुकला होता.एका कवीच्या शब्दात सांगायचे झाल्यास....      "गुन्हा माझा नाही       मी प्रेम तुझ्यावर केले        माझ्या काळजातल्या दुःखे       तुला कधी ना...

आजही दुविधेतच-----भाग सात

*आजही दुविधेतच-----* *भाग:-सात*           किरण कडून असं विचित्र अनं अविश्वसनीय प्रेमप्रकरण घडेल असं कुणालाच वाटलं नाही.तिच्या गावी प्रेमप्रकरणे झाले नाही असेही नाही.पण किरणचं प्रेमप्रकरण जरा इतरांपेक्षा वेगळं होतं.ते तसे हटके अनं कुणाचाही विश्वास बसणारं नव्हतं.त्यास ऐतिहासिक म्हटल्यास वावगे ठरणार नाही.जे भल्याभल्यांना जमलं नाही ते साध्या भोळ्या पणाचा आव आणणाऱ्या किरणनं करवून दाखविलं.तिचा स्वभावगुण,लाजाळूपणा,सुसंस्कारीपणा,स्वच्छ चारित्र्य,कुणाशी फारशी न बोलणारी,सतत घरात व कामात व्यस्त राहणारी,फारशी घराबाहेर न पडणारी,घराबाहेर पडली तरी खालची मान वर न करणारी कुणालाही आकर्षित करेल असं सौंदर्यवान रूप,अर्थात सर्व गुणसंपन्न मुलगी म्हणून तिची सर्व गावभर ओळख होती.सर्व गावाचा याबाबतीत तरी तिच्यावर मोठा विश्वास होता.साधे भोळे पणाचं उदाहरण म्हणून लोक किरणचा दाखला देत असे.किरण कडून गावाचा असा इतिहास रचना जाईल असं स्वप्नातही कुणाला वाटलं नव्हतं.सूर्याचा तर तिचे लग्न होईस्तोवर विश्वास बसला नाही.पण त्याच्याही विश्वासाला तडा गेला.म्हणूनच इतरापे...

आजही दुविधेतच -----!!! भाग सहा

*आजही दुविधेतच* *भाग-सहा*            किरणने सूर्या सोबत बोलण्यास आणि भविष्यात कसलाही संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला.तरीही सूर्या हा तिचे बाबतीत सकारात्मक भूमिकेतच राहिला.प्रेमप्रकरणाची सर्व दूर चर्चा झाली व तिच्या वडिलांना सर्व काही माहित पडल्याने कदाचित ती घाबरली असावी असाच काहीसा तो विचार करायला लागला.किरणच्या प्रती प्रचंड आस्था अनं प्रेम कायम होतं.त्यानं किरणला दोष देण्यापेक्षा स्वतःलाच सावरून घेण्याचा प्रयत्न केला.एकीकडे किरणनं कुठलेही संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला अनं दुसरीकडे कित्येक महिन्याच्या फरकानंतरही तिच्या वडिलांचा राग आहे तसाच होता.कालांतराने किरण सुद्धा तिच्या शब्दावर/मतावर ठाम होती.तिच्या व्यवहारात कसल्याही प्रकारचं परिवर्तन दिसून येत नव्हतं.त्यामुळं सूर्याचं हळवं मन अधिकच विचलित व्हायला लागलं.असं असूनही तो प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनाक्रमाला तितक्याच ताकदीनं एकाकी झुंज देत होता.वेळोवेळी येणाऱ्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करीत होता.प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी काळजीचा/चिंतेचा ठरत होता.अशाही स्थितीत तो पूर्णपणे आशावादी...

आजही दुविधेतच-------!!! भाग पाच

*आजही दुविधेतच* *भाग- पाच*          सूर्याकडून बदनामी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही त्याच्या प्रेमप्रकरणाची माहिती अखेर किरणच्या आई- वडिलांपर्यंत जाऊन पोहचली.हे प्रेमप्रकरण ऐकून किरणच्या वडिलांचा राग अनावर झाला.काय करावं आणि काय करू नये अशीच त्यांची स्थिती झाली होती.कधी नव्हे इतके ते सुड भावनेने पेटून उठले होते.चिडले होते.रागाने बेधुंद होऊन ताबडतोब प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी त्यांनी आपला मोर्चा हा सूर्याच्या घराकडे वळविला.रागाच्या भरात ते काय करतील याची अजिबात शाश्वती नव्हती.येनकेन प्रकारे त्याच्या दृष्टी पटलावर केवळ सूर्याचाच चेहरा गरगर फिरत होता.सूर्याला भेटल्याशिवाय व त्यांना जाब विचारल्याशिवाय त्यांना काही चैन पडणार नव्हतं. म्हणूनच त्यांनी अजय यांना सोबत घेऊन सूर्याच्या घराकडे धाव घेतली.रागानं लालबुंद चेहरा आणि सुड भावना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.अजयनं त्याच्या रागाला अधिक खतपाणी घातलं.सूर्याच्या घराकडे जात असताना वाटेतच शाळेजवळील मंदिराजवळ गजाऊ बसला होता.त्यांची गाठ ही गजाहूशी पडली.तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरील प्रचंड र...